महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणारच! 

महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणारच!

अजित पवार गटाच्या आमदाराची भविष्यवाणी

माजलगाव, दी.२० (प्रतिनिधी): ‘माझ्या ३५ वर्षाच्या राजकीय अनुभवातून सांगतो, महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणारच!’ अशी भविष्यवाणी राष्ट्रवादीचे माजलगाव विधानसभेचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केली आहे. उल्लेखनीय म्हणजे प्रकाश सोळुंके हे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या गटाचे म्हणून ओळखले जातात.

माजलगाव येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकी संदर्भात येथील महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार प्रकाश सोळंके बोलत होते.

 

राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून अजित पवार हे एकनाथ शिंदे यांचा कित्ता गिरवत राष्ट्रवादीची उभी चिरफाड करतील,असा अंदाज राजकीय अभ्यासक व मीडिया मधून व्यक्त होत असतो. सरकार स्थापन झाल्यापासून अजित पवार दोन-तीन वेळा नॉट रिचेबल झालेले आहेत. तसेच विरोधी पक्षनेता म्हणून ते सरकारला पाहिजे तेवढं धारेवर धरताना दिसत नाहीत. सरकारच्या भूमिकेला पूरक अशी भूमिका अजित पवार वेळोवेळी घेताना दिसतात. त्यामुळे अजित पवार लवकरच सरकारमध्ये सामील होऊन शिंदे फडणवीसनच्या असतील सरकारला भक्कम आधार देतील असा विश्वास अनेक जाणकार व्यक्त करत असतात. याबाबत कालच अजित पवार यांनी ‘मी मरेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार’ अशा प्रकारे स्पष्टीकरण दिले असले तरी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर व इतर काही ज्येष्ठ पत्रकार मात्र अजित पवार नक्कीच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देतील, या आपल्या मतावर ठाम आहेत.

अशातच आज अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले माजलगाव विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यात मोठा राजकीय भूकंप नक्की होईल असा जोरदार दावा केल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. ताज्या घडामोडी,बातमी मागील बातमी व नौकरी अपडेट व सरकारी योजनांसाठी वाचत राहा महा जागरण. आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये अवश्य सामील व्हा.#महाजागरण #mahajagaran

Leave a Reply