गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत नवडणुकीत भाजपचा पॅनल विजय करा:अरुण राऊत

माजलगाव,(प्रतिनिधी): गावाच्या सर्वांगीण विकासासाठी तालुक्यातील जनतेने आपापल्या गावांमध्ये भारतीय जनता पार्टी पुरस्कृत पॅनल ला विजयी करून विकासाच्या प्रवाहात सामील व्हावे, असे आवाहन भाजप तालुका अध्यक्ष अरूण राऊत यांनी केले आहे.

याबाबत प्रसिद्ध दिलेले पत्रकात पुढे म्हटले आहे की, सध्या देशात व राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाच्या व्हिजन मधून प्रत्येक खेड्यासाठी जल जीवन मिशन, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना,स्वच्छ भारत, प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल, बेटी बचाव बेटी पढाव, प्रत्येक गाव इंटरनेटने जोडणे, शेतकऱ्यांसाठी पिक विमा योजना, शेतकरी सन्मान योजनेतून प्रत्येक शेतकऱ्यास पेन्शन,अचूक हवामान अंदाज, जलयुक्त शिवार अभियान, पाणंद रस्ते, पेपरलेस व ऑनलाईन सेवा यासह अनेक लोकोपयोगी योजनांची अंमलबजावणी यशस्वीरित्या सुरु आहे.अतिवृष्टी, दुष्काळ व तत्सम कारणामुळे पिके वाया गेल्यास अचूक व वेळेवर नुकसान भरपाई केवळ भाजपच्याच काळात मिळते. कर्जमाफी सुद्धा भाजपच्याच काळात झाली. प्रत्येक गावाचा सर्वांगिण विकास व्हावा हाच अजेंडा घेऊन भारतीय जनता पार्टी सदैव काम करते.

दुसरीकडे महाविकास आघाडी म्हणजेच राष्ट्रवादी,काँग्रेस व शिवसेना (ठाकरे गट) यांच्या हाती सत्ता दिल्यावर काय होते हे महाराष्ट्राला चांगलेच माहित आहे.२०१९ पासून आमदार प्रकाश सोळंके यांच्या काळात माजलगाव मतदारसंघाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. मागच्या वर्षी ऊस गाळपात शेतकऱ्यांची प्रचंड पिळवणूक झाली. मतदारसंघातील रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली आहे. मागच्या तीन वर्षापासून एकही नवीन विकास काम नाही. मतदार संघाच्या सर्व समस्या जैसे थे आहेत.

त्यामुळे माजलगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी आपले गाव पुन्हा विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी पुरस्कृत पॅनलला भरघोस मतांनी विजयी करून नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, पंकजाताई मुंडे यांचे हात बळकट करावेत असे आवाहन भाजप तालुका अध्यक्ष अरूण राऊत यांनी केलं आहे.

Leave a Reply