२० भरून मिळवा २ लाख रुपये!

गोर-गरीबांसाठी केंद्र सरकारची अनोखी योजना

‘जान है तो जहान है’

‘सर सलामत तो पगडी पचास’

अशा म्हणी आपण नेहमीच ऐकतो. माणसाचा जीव किती महत्वाचा आहे हे यातून दिसून येते. आपण स्वतः ला कितीही जपले तरी घडणारी घटना टळत नाही. त्यामुळे लोक विमा पॉलिसी काढून ठेवतात. परंतू विमा योजना खर्चिक असल्याने सर्वच लोक विमा पॉलिसी काढू शकत नाहीत.हे ओळखून केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्य गोरगरीब लोकांना विमा काढता यावा यासाठी अत्यंत कमी रकमेत विमा पॉलिसी ची योजना आणली आहे. चला तर मग आज आपण जाणून घेणार आहोत अपघात विमा पॉलिसी बाबत. सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील माहिती शेवटपर्यंत वाचा…

 

Pradhanmantri suraksha vima yojna

भारताच्या फक्त 20 टक्के लोकांजवळच कोणत्याना कोणत्या प्रकारचा विमा आहे. जिल्ह्यात आतापर्यंत या योजनेंतर्गत 11 लक्ष लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.दैनंदिन धावपळीच्या जीवनात आयुष्य महत्वाचे आहे. अनावधाने अपघात झाल्यास अशा वेळी पूर्ण कुंटुंबावर त्याचा परिणाम होतो. कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावते अशा वेळी प्रधानमंत्री सुरक्षा योजना अत्यंत लाभदायी ठरत आहे. या योजनेचा विमा हप्ता केवळ 20 रुपये असून अपघातात पूर्णत: अपंगत्व आल्यास 2 लक्ष रुपये व आंशिक अपगंत्व आल्यास 1 लक्ष रुपये मिळतात. बॅक खातेधारकांनी आपल्या बँकेत साधा अर्ज करावा. खात्यातून आपोआप ही विम्याची रक्कम वर्ग करण्यात येते.

 

PMSBY प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना केंद्र शासनाची अपघात विमा योजना असून मे 2015 पासून ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेचा विमा हप्ता 13 रुपये होता त्यामध्ये वाढ करुन आता फक्त 20 रुपये करण्यात आला आहे. या योजनेची व्याप्ती वाढविण्याकरीता जास्तीत जास्त बँक खातेदारांनी यामध्ये सहभागी व्हावे हा मूळ ध्येय आहे.

कोणाला काढता येईल ही पॉलिसी?

18 ते 70 वयोगटातील सर्व व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात, लाभार्थ्याचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे. योजनेसाठी वार्षिक हप्ता 20 रुपये असून तो दरवर्षी लाभार्थ्याच्या बँकखात्यातून आपोआप वर्ग होईल, हप्त्यासाठी आर्थिक वर्षे 1 जून ते 31 मे असेल. प्रत्येक बँकेत या संदर्भातील अर्ज आहे. खाते असणाऱ्या प्रत्येकाने हा अर्ज करणे आवश्यक आहे.

 

किती द्यावा लागेल वार्षिक हप्ता?

योजनेसाठी वार्षिक हप्ता 20 रुपये असून तो दरवर्षी लाभार्थ्याच्या बँकखात्यातून आपोआप वर्ग होईल, हप्त्यासाठी आर्थिक वर्षे 1 जून ते 3 मे असेल.

 

किती मिळेल विमा लाभ ?

लाभार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास वारसदाराला 2 लाख रुपये अर्थसाहाय्य मिळेल, लाभार्थ्याला अपघातामुळे पूर्ण अपंगत्व आल्यास 2 लक्ष रुपये व आंशिक अपंगत्व आल्यास 1 लक्ष रुपये अर्थसाहाय्य दिले जाते .खाते ऑटो व डेबिट करण्याची सुविधा या योजनेमध्ये आहे. योजना न्यू इंडिया एश्योरेंस कंपनीशी संलग्नित आहे.

 

व्यवस्थापन – योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी एल आय सी किंवा कोणत्याही विमा कंपनीत खाते उघडू शकतो.

 

‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांमध्ये प्रत्येक बँकेने हा अर्ज भरुन घ्यावा. केवळ 20 रुपये खात्यातून कपात होणाऱ्या या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

 

मित्रांनो आपणास वरील माहिती आवडली असल्यास आपले मित्र,नातेवाईक यांच्याशी शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन सरकारी योजना, जॉब अलर्ट व बातमी मागील बातमीसाठी वाचत राहा महा जागरण… डेली अपडेट मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका.

Leave a Reply