हिंदु समाजाचा बुध्दीभेद – रवींद्र सासमकर जालना

हिंदु समाजाचा बुध्दीभेद

हिंदु समाजात फूट पाडण्यासाठी काही समाजविघातक लोक भक्त प्रल्हादाचा नातु बळिराजाचे उदाहरण समोर ठेवून विकृत मांडणी करत असतात. वास्तविक बळीराजा हा आम्हाला आदरणीयच आहे. दानशुरतेचे उत्तम उदाहरण म्हणून बळीचे उदाहरण दिले जाते.आमच्या संस्कृतीने बळीराजाला सप्तचिरंजीवांमध्ये स्थान दिलेले आहे.

परंतु स्वत:ला पुरोगामी म्हणवणारे अर्धवटराव पुराणातील मांडणीला विकृत करुन स्वत:चा अजेंडा चालवत असतात.
त्यासाठी महात्मा फुलेंचाही वापर करुन घेतात. त्यांचा स्वतचाच वैचारिक गोंधळ फार मोठा आहे.
* ते म्हणतात रामायण,महाभारत आणि पुराणे खोटी आहेत,पण त्या पुराणातील बळीराजा मात्र त्यांना खरा वाटतो.
जर पुराणे खोटी असतील तर बळीराजा खरा कसा? आणि बळीराजा हे वास्तव असेल तर पुराणे खोटी कशी?
* काही फुरोगामी बांडगुळ वामनदहनाचे कार्यक्रम करत असतात. परंतु त्यांना कल्पना नसते की वामनावतार हा संत तुकारामासह अनेक संतांना वंदनीय आहे. तुकोबारायांनी “वामनमुर्ती त्रिविक्रमा” म्हणून भगवान विष्णुची स्तुती केली आहे. महाराष्ट्रातील सर्वच संत हे भगवान विष्णुंचे भक्त होते.
* सध्या रावणाचेही उदात्तीकरण करण्याची मोहीम सुरु झाली आहे. भाऊबीज आणि रक्षाबंधनाच्या दिवशी रावणासारखा भाऊ हवा वगैरे मॅसेज शेअर केल्या जातात,या लोकांना रावण कोण? त्याचे व्यक्तीमत्व याबद्दल कवडीची अक्कल नसते.
कुठल्यातरी “फ” दर्जाच्या कादंबर्या वाचुन रावणाला धुतल्या “तांदळा”सारखा करण्याचा मूर्खपणा करत असतात.
* हे लोक शिवछत्रपति आणि शंभुछत्रपतिविषयी आदर असल्याचे दाखवतात,पण सगळ्या छत्रपतिंना देवीदेवता आणि साधुसंताबद्दल आदर होता,त्यांना हे लोक शिव्या घालतात.
* डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर कम्युनिझमचा विरोध केला. घटनासमितीच्या भाषणात ते म्हणाले होते की “देशाच्या संविधानाला कम्युनिस्टांकडुन धोका आहे”
दुर्देवाने एकीकडे बाबासाहेबांचा जयजयकार करायचा,आणि दुसरीकडे चे गव्हेरा,कार्ल मार्क्स,लेनीन ,माओ यांचाही उदोउदो करायचा,हा दुटप्पीपणा आहे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी ही राष्ट्राला पोषक तर डाव्या लाल सलामवाल्यांची विचारसरणी राष्ट्राला मारक आहे.
* शिवचरित्रातही असल्याच थापा हे लोक मारत असतात. शिवरायांच्या सैन्यात 57% तर कुठे 90% मुस्लिम असल्याचे पोकळ दावे करणे,त्यांनी न बांधलेल्या मशिदीचे चित्र प्रकाशित करणे,यातुन हिंदु समाजाचा बुध्दीभेद करण्याचा प्रयत्न केला जातो.
* स्वत:ला इतिहास संशोधक म्हणवणारी पिवळी जमात हल्ली खूप वाढली आहे. हे इतिहास संशोधक आहेत,तर यांनी इतिहासात कोणती नवीन कागदपत्रे उजेडात आणली? कोणता शोध लावला? यांना मोडी,फारसी ,संस्कृत ,अरबी या शिवकाळाच्या संशोधनासाठी आवश्यक भाषा वाचता ,लिहिता येतात का? मग हे कसले संशोधक? हे जर संशोधक आहेत,तर आम्ही देऊ ते मोडी पत्र ते जाहीररित्या वाचून दाखवतील का?
दुर्देवाने महाराष्ट्रातील स्वत:ला सुशिक्षित म्हणवणारे लोकही अशा तथाकथित संशोधकांनी हर्बल गांजा मारुन लिहलेली पुस्तके बिनडोकपणे खरी मानतात आणि आपल्या शिक्षणाचा पंचनामा करतात.
हे सगळे उद्योग करण्यामागे त्यांचा हेतु एकच असतो- हिंदु समाजात फूट पाडणे,बुध्दीभेद करणे……आणि उद्या भारतावर इस्लाम ,ख्रिश्चॅनिटी अथवा लाल क्रांतीचे राज्य प्रस्थापित करणे….यासाठी हे “घर के ना घाटके” लोक इमाने इतबारे सेवा देत आहेत. समस्त राष्ट्रभक्त समाजाने सावध राहून या राष्ट्रविघातक कारवायांचा प्रतिकार सर्व पातळ्यांवर केला पाहिजे.
भारतमाता की जय
वंदे मातरम
जय भीम
जय भारत
– रवींद्र सासमकर जालना

Leave a Reply