कारखाना निवडणुकीवरून नितीन नाईकनवरेंचे प्रकाश सोळंकेना……

माजलगाव प्रतिनिधी
——
माजलगाव, प्रतिनिधी: लोकनेते सुंदरराव सोळंके साखर कारखान्याचा पंचवार्षीक निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झाला असुन ही निवडणुक आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी बिनविरोध काढावी केवळ विरोधासाठी – विरोध करण्यात येणार नसुन आ. सोळंके यांनी उस भावाचा वेळो – वेळी दिलेला शब्द पाळावा व शेतक-यांचे हित जोपासत या कारखान्याचे संस्थापक कै. सुंदरराव सोळंके यांनी चालवल्याप्रमाणेच कारखाना सुरळीत चालवुन उस उत्पादक शेतक-यांना योग्य भाव देत शेतक-यांना आर्थिक आधार द्यावा असे माजी सभापती नितीन नाईकनवरे यांनी
सांगीतले.

लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याची उभारणी माजी उमुख्यमंत्री कै. सुंदरराव सोळंके यांनी शेतक-यांच्या हितासाठी केली . या कारखान्याची पंचवार्षीक निवडणुक कार्यक्रम जाहिर झाला असुन केवळ विरोधासाठी विरोध करणे याकरीता ही निवडणुक लढविण्याची भुमिका मी कधी घेतलेली नाही पूर्वीसुद्धा छत्रपती कारखाना बिनविरोध निघावा अशी आमची भूमिका होती त्याचप्रमाणे आमदार प्रकाश दादा सोळंके यांनी सोळंके सहकारी साखर कारखाना कै. सुंदरराव सोळंके यांनी शेतकरी हितासाठी ज्याप्रमाणे कारखाना चालविला त्याच धर्तीवर कारखाना चालवावा तसेच आमदार सोळंके यांनी उसदराबाबत वेळोवेळी दिलेला शब्द पाळावा व राष्ट्वादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शंभर रूपये भाव देण्याचा दिलेला शब्द देखिल पाळलेला नसुन तो शब्द पूर्ण करावा तसेच यावर्षी देखिल जाहिर केलेला भाव शेतक-यांना अदा करावा एवढीच माफक अपेक्षा आहे शेतक-यांच्या हितासाठी होणारी ही निवडणुक कारखान्याच्या सभासदांनी बिनविरोध काढावी असे आवाहन माजलगाव बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक नितीन नाईकनवरे यांनी केली आहे.
तालुका परिसरात असलेल्या तीन साखर कारखान्यापैकी सोळंके सहकारी साखर कारखान्याची गाळप क्षमता चांगली असून या कारखान्याकडे विविध उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्प आहेत यामध्ये वीज निर्मिती प्रकल्प व डिस्टलरी हे प्रकल्प मागील अनेक वर्षांपासून आहेत परंतु असे असून सुद्धा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाला जास्तीचा भाव मिळत नाही वास्तविक पाहता सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांना इतर कारखान्याच्या तुलनेत 300 ते 400 रुपये जास्तीचा भाव मिळावा असे अपेक्षाही बाजार समितीचे माजी सभापती नितीन नाईकनवरे यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply