भटके विमुक्तांच्या न्याय हक्कासाठी शिंदे-फडणवीस सरकार कटिबद्ध – आ.बावनकुळे

नागपुरात भटक्या विमुक्तांचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन

नागपूर (अशोक दोडताले): मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार बुलेट ट्रेनच्या वेगाने काम करत आहे. समाजातील सर्व घटकांना समान न्याय देत असतांना सरकार भटक्या विमुक्त समाजाच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक असून लवकरच सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी बैठक बोलावण्यात येईल असे आश्वासन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

नागपूर येथे आज भाजप भटके विमुक्त आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले यावेळी समारोपीय सत्रात बावनकुळे बोलत होते. अधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रीय घुंमंतू आयोगाचे माजी अध्यक्ष भिकुजी (दादा) इदाते यांच्या हस्ते झाले.आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नरेंद्र पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रदेश प्रभारी संजय केणेकर,आमदार गोपीचंद पडळकर, विश्वास पाठक, भटके मुक्त आघाडीचे प्रदेश सरचिटणीस अशोक चोरमले, प्रवक्ते गणेश हाके, विनोद वाघ, मा. आ. विजयराज शिंदे, योगेश बन, अनिल फड, गोविंदा गुंजाळकर, डॉ.उज्ज्वलाताई हाके, युवाचे प्रदेशाध्यक्ष अमोल गायकवाड,युवराज मोहिते, प्रमोद परदेशी, मराठवाडा अध्यक्ष बंडूजी खांडेकर, डॉ.उज्ज्वलाताई दहिफळे, प्रदेश सचिव श्रीराम मुंडे आदीसह आघाडीचे सर्व प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते.

अधिवेशनाचा समारोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. यावेळी बोलताना बावनकुळे म्हणाले की, भटके विमुक्तांनी आता काळजी करण्याची गरज नाही. शिंदे- फडणवीस सरकार हे भटक्या-विमुक्तांचे प्रश्न सोडवण्याचे काम करत आहे. अधिवेशनात ठरावाच्या स्वरूपात ज्या मागण्या मांडण्यात आल्या त्याबाबत लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत विशेष बैठक घेण्यात येईल असेही बावनकुळे म्हणाले. भटक्या समाजातील सर्व घटकांना पक्ष स्तरावर व निवडणुकीमध्ये न्याय देण्याचे काम भाजप करेल, पालक म्हणून ही माझी जवाबदारी आहे असा विश्वास त्यांनी दिला. संघटनेचे पहिलेच राज्यव्यापी अधिवेशन कमालीचे यशस्वी केल्याबद्दल नरेंद्र पवार व सर्व पदाधिकाऱ्याचे कौतुक केले. तसेच शासकीय समित्यांवर जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना संधी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

 

 

यावेळी भटके विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र पवार यांनी भटके विमुक्तांचे पारंपरिक उद्योग- व्यवसाय, लोककला यांना वाव देण्यासाठी ही आघाडी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या विविध प्रश्नासाठी सरकार दरबारी पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आवश्यक तिथे संघर्ष करुन या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपला अग्रक्रम असल्याचे पवार म्हणाले.

काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे भटके विमुक्त समाज मागे राहिला आहे. आता भटके विमुक्तांचे सरकार आहे त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. हिंदुत्वाच्या पोशाख घालून काही राजकीय मंडळी भटके विमुक्तांना विचलित करू पाहत आहेत असे प्रदेश महामंत्री संजय केनेकर यांनी सांगितले. अधिवेशनात भिकुजी दादा इदाते, पद्मश्री विकास महात्मे, गणेश हाके आदींची भाषणे झाली.

संघटनेचे प्रदेश महामंत्री अशोक चोरमले यांनी विविध मागण्यांचे प्रस्ताव सदर केले. त्यात विमुक्त भटक्या समाजाच्या लोकसंख्येचे सर्वेक्षण करून संख्या निश्चिती, शासनाने 31 ऑगस्ट हा विमुक्त दिवस म्हणून साजरा करणे, अनुसूचित जमातीच्या सर्वांगीण विकासाच्या सर्व योजना विमुक्त भटक्या समाजाला लागू करणे, सर्व विद्यापीठात विमुक्त भटक्यांचे अभ्यास केंद्र स्थापन करणे, विमुक्त समाजाच्या कला संस्कृती व भाषा जतन करण्यासाठी संग्रहालय स्थापन करणे, पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या विमुक्त भटक्या समाजाला स्वामित्वधन (रॉयल्टी) मध्ये सवलत मिळणे, केंद्राच्या सूचनेनुसार विमुक्त भटक्या समाजासाठी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय तक्रार निवारण व सल्लागार समिती तात्काळ स्थापन करणे, विमुक्त भटक्या समाजासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या योजनांना लोकसंख्येच्या प्रमाणात आर्थिक तरतूद करणे, शासनाच्या सर्व योजनांमध्ये एससी एसटी नंतर विमुक्त भटके समाजाला प्राधान्य असावे, मंत्रालयीन विभागाचे नाव विमुक्त जाती भटक्या जमाती कल्याण विभाग असे पूर्ववत करावे व त्यासाठी स्वतंत्र मंत्री व राज्यमंत्री असावा, आश्रम शाळांमध्ये सध्या निवासी विद्यार्थ्यांची संख्या १२० आहे ती १८० करावी व त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी विशेष योजना तयार करावी, भटक्यांच्या अंगभूत गुणांना वाव मिळावी यासाठी विशेष अभ्यास क्रम तयार करून आश्रमशाळामध्ये सुरू करावा, जातीच्या दाखल्यांच्या पुराव्यासाठी लागणाऱ्या जटिल अटीमध्ये बदल करणे आशा विविध मागण्यांचा समावेश आहे.

यावेळी प्रदेश सरचिटणीस गोविंदा गुंजाळकर, संतोष आव्हाड, राजू साळुंखे, शिवाजी आव्हाड, देविदास राठोड, धरमसिंग राठोड, युवती अध्यक्ष भाग्यश्री ढाकणे, डॉ.समिरा भारती, डॉ. उज्जवला दहिफळे, कडनर कोंडाजी, डॉ.गुलाबराव सांगळे, सतीश भोसले, डॉ.लक्ष्मण जाधव, डॉ.रमेश तारगे, अशोक पिसाळ, सीताराम वणवे, दत्ता बन, श्रीरंग राठोड, सौ.आनिताताई जाधव, संतोष हादवे, किशनसिंग टाक तसेच महिला, युवक व युवती विभागाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठवाडा विभागाने लक्ष वेधले...

या राज्यव्यापी अधिवेशनात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. विभागातून संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष बंडू खांडेकर व डॉ.उज्वलाताई दहिफळे यांच्या नेतृत्वाखाली आठही जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. याची विशेष दखल घेऊन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार यांनी खांडेकर यांचे कौतुक केले. मराठवाड्यातील दोनशेपेक्षा जास्त पदाधिकारी अधिवेशनात हजर होते.

Leave a Reply